Search This Blog

Thursday 28 April 2011

यावे मला असे मरण....

यावे मला असे मरण....
तद् नंतर व्हावे माझे स्मरण !
आठवावे दोष माझे...
नि आठवावे माझे गुण !
दुःख अशांनाच व्हावे,
कि त्यांचे हृदयही रडावे,
मम अपराधांना स्मरूण तयांनी
क्षमेचे फूल देहावर वाहावे!
नकोत कुणाचे पोकळ अश्रू,
वरचे दुःख नि आतले हसू.
अशांनी कृपया येऊच नये,
मम आत्म्याला दुखवू नये!
अश्रू थोड्यांचेच
मला न्यायचे आहेत,
जन्मोजन्मी मनात
ठेवायचे आहेत!!

यशाला शॉर्टकट नसतो

यशाला शॉर्टकट नसतो. व्यवसायात पूर्ण मार्ग वाटचाल करुन गेल्यावरच यश मिळते.
* दर्जेदार माल आणि उत्तम सेवा याद्वारेच तुम्ही ग्राहकांना प्रभावित करु शकता।
* व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढवायचे असेल तर अनावश्यक खर्च टाळायला हवेत।
* ग्राहकांशी नेहमी थेट आणि नेमक्या शब्दांत संवाद साधणे फायदेशिर ठरते.
* ज्याला इतरांवर आपला प्रभाव पाडण्याची इच्छा असते, त्याने कधीही कुणाचा अपमान करु नये.
* यश हे केळ मुक्कामाचे ठिकाण नव्हे, तर तो एक अखंड प्रवास आहे.
* माणसांची पारख करण्याचे कौशल्य हे सुखी जीवनाचे रहस्य आहे.
* भुतकाळाचे भान, वर्तमानाचं ज्ञान आणि भविष्याचं विज्ञान जेव्हा एकवटतं तेव्हाच प्रगतील सुरुवात होते.
* तुम्ही जे ध्येय ठरविले असेल, तसा आकार तुमच्या जिवनाला प्राप्त होईल.
* व्यवसायाची जाहिरात प्रभावी करायची असेल तर त्यासाठी व्यवसायाची पार्श्वभुमीही तितकीच प्रभावी असणे आवश्यक असते.
* तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणचे स्वागत कक्ष कसे आहे. यावरही तुमच्या व्यवसायाचे यश अवलंबून असते.
* व्यवसायातील प्रतिसर््पध्याचा पदोपदी अपमान करुन नव्हे; तर त्याच योग्य मान राखुन त्याच्याशी निखळ स्पर्धा करा.
* जगातील सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे समजूतदारपणा.
* मधुर वाणीच्या व्यावसायिकाच्या दारात दारिद्रय कधीही येत नाही.
* व्यवसायात तुमची गुंतवणूक किती आहे, यापेक्षाही महत्चाची बाब म्हणजे व्यवसायावर तुमची निष्ठा किती आहे?
* मनुष्याला जगण्यासाठी अन्नाची जेवढी गरज असते, तेवढीच वाचनाचीही गरज असते.
* प्रसन्न चित्ताने तुम्ही जे व्यवहार कराल ते फायदेशिर ठरतील.
* ग्राहकांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी एक तक्रारपेटी तुमच्या व्यावसायाच्या जागेत असणे फार आवश्यक आहे.
* नुसत्या कल्पनेपेक्षा प्रत्यक्ष उदाहरण हे नेहमीच जास्त परिणामकारक असते.
* जो चालतो तोच पोहोचतो. जो फक्त विचार करीत राहतो तो कधीच पोहोचत नाही.
* माफक नफ्यासाठी तुम्ही ग्राहकांशी खोटे बोलाल तर भविष्य काळात तुम्हाला फार मोठा तोटा सहन करावा लागेल.
* व्यावसायिकाच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यावरही व्यवसायातील नफ्याचे प्रमाण अवलंबून असते.
* विक्रीपश्यात सेवेलाही व्यवसायात विक्रीइतकेच महत्व असते.
* व्यवसायासाठी असे ठिकाण निवडा तिथे तुमचे संभावित ग्राहक अगदी सहजपणे पोहचू शकतील.
* व्यवसायातील केवळ जमा-खर्चाचाच हिशोब ठेवू नका, तर अनावश्यक खर्चाचाही हिशोब ठेवा.
* काही गोष्टींना स्पष्ट शब्दांत नकार देणे हा गुण व्यवसायात फार महत्वाचा असतो.
* व्यवसाय करताना केवळ नफा मिळविण्याकडे लक्ष देवु नका, तर ग्राहकाचा विश्वास कसा मिळविता येईल, याकडेही लक्ष द्या.
* ग्राहक तुमच्या दुकानातून खरेदी करुन जात असताना ' आणखी काही हवंय का साहेब ? हा प्रश्न त्याला विचारायला मुळीच विसरु नका.
* बाजारात आलेले नवे उत्पादन विके्रत्याने आधी स्वत: पारखून घ्यावे. मग ते विक्रीसाठी उपलब्ध करावे.
* हातून घडलेल्या चुकांबाबत विचार करण्यात वेळ वाया घलवू नका, त्यापेक्षा भावी काळात चुका टाळता कशा येतील याबाबत प्रयत्न सुरु करा.
* तुम्हाला शक्य नसल्यास कामासाठी वेळीच स्पष्ट नकार द्यायला शिका. त्यामुळे तात्पुरता वाईटपणा आला, तरी पुढील अनेक कटकटी टाळता येता.
* काही निर्णय चुकीचे ठरले तरी चालतील, पण आपले निर्णय स्वत:च घेण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे.
* तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करा. जनसंपर्क वाढविण्याच्या दृष्टीने ते फायदेशिर ठरेल.
* तुम्ही तुमची कामे जितकी पुढे ढकलाल तितके यश तुमच्या पासून दुर जाईल.
* तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक नवपरिचीत व्यक्तीचे नाव अशा प्रकारे लक्षात ठेवा की पुढील भेटीत तुम्हाला त्या व्यक्तीला तिच्या नावाने संबोधता आले पाहिजे.
* तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्ही प्रगतीपथावर आहात असे म्हणता येईल.
* प्रत्येक वादाच्या मुद्दयावर, समस्येवर पहिला उपाय म्हणजे चर्चा, चर्चेतून अनेक प्रश्न सहजपणे सुटु शकतात.
* परिस्थितीप्रमाणे स्वत:ला बदलण्याची तयारी ठेवा. यश सदैव तुमच्या पाठीशी राहील.
* हाती घेतलेले काम आधी पूर्ण करा. मगच दुसऱ्या कामाकडे लक्ष द्या. एकावेळी अनेक कामे डोक्यात असतील तर कोणतेही काम व्यवस्थित पार पडणार नाही.
* तुम्ही दिवसभरात जे काही चांगले पाहाल किंवा ऐकाल त्यांची नोद डायरीत करुन ठेवा. त्याचा तुम्हाला भविष्यकाळात निश्चितच फायदा होईल.
* केवळ प्रयत्नांमुळे नव्हे; तर प्रयत्नांच्या सातत्यामुळे यश मिळते हे कधीही विसरु नका.
* ग्राहकाचा वेळ वाया न घालविण्याचे तत्व जो पाळतो, तोच व्यावसायीक यशस्वी होतो.
* कमी वेळात जास्त काम ' याचा अतिरेक टाळावा, कारण त्यातून अनेक प्रकारचे ताण व संघर्ष निर्माण होवुन शेवटी वेळेची हानीच होते.
* खोटेपणाचा आधार घेवुन नफा मिळविणे शक्य असते. परंतु तो नफा व्यावसायिकाला अनेक संकटांच्या जाळयात अडकवून टाकतो व त्यातून बाहेर पडता येणे शक्य नसते.
* वेळ : वेळेचं महत्व समजून घ्या. वेळ वाया घालवू नका. लाखो करोडो रुपये देवुनसुध्दा आपण वाया गेलेला एक क्षण विकत घेवू शकत नाही. वेळ तुमची तेव्हाच कदर करेल. जेव्हा तुम्ही वेळेबरोबर चालत रहाल.
* पुस्तक : बौध्दीक खुराक देणार, ज्ञान वाढवणारं सर्वात उपयोगी साधन चांगली पुस्तकं आपल्याला नेहमीचं उत्साहीत करतील, आणि नकारात्मक विचारांपासून दूर ठेवतील. म्हणतात ना वाचाल तर वाचाल.
* विचार : नव्या आणि चांगल्या विचारांचं नेहमीच स्वागत करा.
* मित्र : नेहमी चांगले आणि नवनवे मित्र बनविण्याचा प्रयत्न करा. यामुळे जगाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलू शकेल.
* आत्मपरिक्षण : वेळोवेळी आत्मपरिक्षण करुन स्वत:ला पारखा. आपल्या उणिवा शोधून काढून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करा. चांगली टीका करणारे आपले मित्रसुध्दा आपल्या वाईट सवयींना सुधारु शकतात.
* कधीही आपला विचार नकारात्मक नसावा. तो सकारात्मकच असला पाहिजे.
* हातावर हात ठेवून बसू नका तसेच केवळ स्वप्नेच पाहत राहू नका तर ती सत्यात आणण्यासाठी योग्य दिशेने पाऊल टाका.
* जीवनात रिस्क घ्यायला शिका, कारण रिस्क किंवा जोखमीविना कोणत्याही कामात यशाची खात्री बाळगता येत नाही.
* नेहमी आशावादी दृष्टीकोन बाळगा.
* आपला आत्मविश्वास टिकवून ठेवा, तसेच आपले निश्चयही ठाम असावेत.
* उत्साह कायम असावा, परंतु त्याचबरोबर अतिउत्साहापासूनही स्वत:चा बचाव करावा.
* निराशा आणि काळज्या दूर ठेवा.
* लहान सहान अपयशाने खचून जावु नका. लक्षात असून द्या, की जर तुम्हाला गुलाबाचं फूल हवे असेल तर त्यासाठी काटयांनादेखील तोंड द्याव लागेल.
* चांगले शिक्षण देणारी पुस्तके आणि नियतकालीके वाचा.आपल्या चुका सुधारा आणि इतरांशी तुलना करण्याची सवय सोडून द्या

Monday 25 April 2011

एक क्षण तरी माझ्यावर प्रेम कर

हजारो लाखो असतील तुझ्या मागे पुढे
कदाचित तुझ्या लेखी असो आम्ही त्यातलेच एक बाजीराव फाकडे
 खऱ्या खोट्या प्रेमाची जाण फक्त तुलाच आहे..
म्हणूनच मोडेन पण वाकणार नाही म्हणणारा हा पठठया तुझ्यापुढे नमायला तयार आहे
 माहितेय ...माहितेय... सगळचं आपल्या मनासारखं घडावं असं नसतं काही
पण भावना पोचल्या तुझ्यापर्यंत आणि एक स्मितहास्य आलं....
 तर समजेन एका क्षणापुरतं तरी माझ्या प्रेमाला दाद दिली.. !!!
आणि मी यातचं सारं आयुष्य सामावून बसेल....
 त्या एका क्षणाला मी ब्रम्हदेवाचा क्षण समजतो..
कारण त्यामुळेच सात जन्म मी तुझं प्रेम मिळवू शकतो
 म्हणूनच एक क्षण तरी माझ्यावर प्रेम कर

हो!मीच फ़सवलय त्याला! आता वाटते हातातील लेखणी मोडुन टाकावी फ़ाडुन् टाकाव्यात् त्या कविता , X



हो!मीच फ़सवलय त्याला!
आता वाटते हातातील लेखणी मोडुन टाकावी
फ़ाडुन् टाकाव्यात् त्या कविता ,
फ़क्त शव्ब्दांच्या जाळ्यात् गुंफ़लेल्या,
आणि ओरडुन् सांगावे जगाला ...
हो!मीच फ़सवलय त्याला!

आज थांबवलय मि फ़सवायचे
स्वतःला आनि त्याला हि
मुक्त केलय त्याला प्रेमाच्या खेळातुन्
आणि ओरडुन् सांगितले जगाला ...
हो!मीच ..

उन्मळुन पडलाय् तो मुळापासुन्
विश्वास उडालाय् त्याचा प्रेमावरुन्
आणि ह्रुद्यात् आहेत फ़क्त जखमा!

पण्! मला महित् आहे
जखमा कधि तरि भरतील
प्रेमाचे अन्कुर् कधितरि पुन्हा फ़ुटतिल
दुःखातुन हि तो वर येयील आणि
नव् जग निर्माण् करेल

पण्!
नसत जमल त्याल्या पांडव होवुन
आपल्याच् नात्याशि झगडन्
ना जमल असत जपलेल्या मुल्यान्चा
स्वतःच्या हातानि र्हास् करण्,
कदाचित् नव जग उभाहि केल असत्..
पण् नसत जमल त्याला त्यात वावरण्!

म्हणुन मीच वाटा बदलल्या
उध्वस्त केली ति स्वप्न
आणि आता..
जगत आहे त्या चुरगाळलेल्या पानाना कुरवाळत
आणि त्याच्या वेदना मुकपणे सोसत्..

कारण!मीच फ़सवलय त्याला..फ़क्त् मीच्!

ईंजीनियरिंगला मुले का नापास होतात?

शिकण्यात कधी interest होता, पण बारावीला पेर्सेंटेजचा भुत्या मागे होता.
नाहीतर आमच काय होत्याचा झाला नव्हता, कारण अभ्यासाच्या धडावर नेहमीच घातला कोयता.
ईंजीनियरिंगला आलो ही तीर्थरूपांची क्रुपा, ईंजीनियर हो म्हणून भरीस घालते शेजारची क्रुपा.
ईंजीनियरिंगचा अभ्यास फ़ार मोठा करू या जपा, अभ्यास सोडून ईतरच सर्व केले रिझल्टच्या वेळेस आता कुठे लपा?
होते २४ तास पण झोप नव्हती सरत, व्हायची मध्यरात्र पण गप्प नव्हत्या सरत.
वेळच्यावेळी मेसचे खाऊन पोट नव्हते भरत, ईंजीनियरिंगच्या conceptsशी करत नव्हतो कसरत.
होते seniors सांगायला करू नकोस काही, आम्ही नाही केले आमचे बिघडले का काही?
त्यांच्यावर ठेवला विश्वास, आणि तसेच केले सर्व काही, आता marks मिळवलेत काहीच्या बाही.
एवढे हजार, एवढे लाख, मोजतात आईवडिल खर्च, एवढे दिवस, एवढा पगार मी लावतो पदरच!
ईंजीनियर होऊनही ज्ञान मिळवलं वरवरचं, आता बोल लावू कुणाला सांगतो तुम्हाला खरोखरच!

Wednesday 20 April 2011

!!महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!


images?q=tbn:ANd9GcQvo3_91t6thKyceQeigyfAB5-uT_35Ivy5s9heYwYOSFwJlK7i6TqMOfk



राजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही
स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही,
तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही.
तिथे तुमचे स्मरण करून साधी दोन फुलही वाहात नाही.
पण, मात्र त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची"
कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय.
त्याच्या कबरेला कुण्या "हिंदू-द्रष्ट्यांने"
कलंकित करू नये म्हणून खासे आसणारे आमचे "पोलिस बळ"
आम्ही तैनात करतो.


images?q=tbn:ANd9GcS8h7YXvSfUvv4a8gY7opmY9_RBGS9tFDKtpHdRM_S9ZfW8KCtryg

 
ज्या "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी"
या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले,
त्यांचेच तैलचित्र आज आमच्याच सरकारी-कारभारी कचेर्‍यात लावण्यास मज्जाव होतो.


images?q=tbn:ANd9GcSQrX6HWspWoerdaOOv8YCTshPGYVQtBwGEmvIA3sN2UQoQIIMy 
तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही.
ज्या "हिंदूह्रुद्यसम्राट शिवाजी राजांनी" या औरंगजेबाचा अटकेपार बिमोड केला.
आज त्याच "शिवाजी राजांच्या" पराक्रमाची गाथा
ईतिहासाच्या पुस्तकात आक्षेपहार्य वाटू लागली आहे आमच्या शिक्षण श्रेष्ठींना.




images?q=tbn:ANd9GcQmsorb0jcOhCHQzMbRfTAr4GwNz9r6Ggi_lNwy8gj4InaMuzmO 
- Show quoted text -
इतकेच काय, भारतात संसदेवर हल्ला होतो,
मुंबईत अमानुष बॉम्बस्फोट घडतात, अगदी आमने-सामने चकमकी होतात.
यात आमचे लाख-मोलाचे खंदे वीर आम्ही गमावले....
सर्वांचे पुरावे-आरावे मिळाले....लोकांनी आँखो-देखी कबुली दिली.
अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली,
पण तो आजही साजूक तुपातली बिर्यानी अगदी मख्खन मारके......
पाची बोट चाटीत पुन्हा कारवायांची नांदी खेळतोयच....!
कसाब जिवंत पकडला, त्याला अनेकांनी आँखो-देखे पाहिले.
पत्रकारांनी बातम्यांमध्ये, दूरदर्शनवर तमाम जनतेस
त्याचे काळेकृत्य दाखवले… आम्ही मिटक्या मारीत पाहिलेही ...
तरी सूद्धा आम्ही कोर्टात दावेच चालवतोय......,
आणि फार-फार तर काय आमच्या काही सच्च्या, निर्भिड,
उज्वल वकिलांमार्फत फाशीची शिक्षा झालीच तर
हा सुद्धा आमच्या "हिजडया- राजकर्त्यांच्या" कुशीत बसून
त्या आदम अफझल गुरू सोबत बिर्यानीची लज्जत घेणार.....
आणि फाशीच्या शिक्षेनंतरही आमचीच जनता आमच्याच
कायद्याला ताठ मानेन आव्हान करतात.
"फाशीची शिक्षा देणार्‍या न्यायाधीशांचे खून पडतील"
- फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर.
"भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधींसारख्या
शांति दुताच्या देशात फाशीची शिक्षा असावी यापेक्षा दुर्भाग्य ते कोणते.......?
त्याना फाशी ऐवजी, हवी तर जन्मठेप द्या....."
.......हवी तर......?..... ..म्हणजे नक्की काय.......?
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस, तारिक आन्वर.
यांसारखे अनेक धर्ममिंधे आज आमच्याच घरचे वासे मोजतायत्....
आपल्याच मातृभुमीच्या कलेजाची लक्तर तोडतायत्....
जे या दहशतवादी हल्ल्यात "शहीद" झाले,
आज त्यांच्या चुलीत आग नाही..... याचे यांना काही सोयर-सुतक आहे का......?
आणि दुसर्‍या बाजूला "साध्वी ऋतुंबरा" प्रकरणात कटाक्ष टाकलात तर तिचा गुन्हा.......?
.......गुन्हा सिध्द होण्याअगोदरच तिचा किती मानसिक आणि शारारीक छळ केला गेला.......तिचे जिणे मुश्कील केले गेले....
आम्ही मानतो.......गुन्हा हा शेवटी गुन्हाच आहे....त्यात कोणतीच कैफियात नाही.....पण.......
मग...."एकाला दूधभात आणि एकाला ताकभात का....?"
हा पक्षपात कशासाठी ....?...
का......तर तिने मूठभर अल्पसंख्यांकांच्या जनहिताला ठेच पोहचवीली...म्हणून....?
मग....आम्ही.....कोण....?......
आम्हाला....भावना नाहीत....?
....आमच्या भावनांचा उद्रेक होत नाही.....?
गांधीनीही फाळणीच्या वेळेस हेच केले....
आम्ही सहन करतो...म्हणजे..."तो एक सृष्टीनियमच आहे...."
...असे यांचे मत....तेंव्हा ही.... हे....हे....आपले राष्ट्रपिता
मातृभूमीच्या छातीत खंजीर खुपसुन...५५ कोटी रुपये,
(म्हणजे आजचे अंदाजे १४ हजार ८० कोटी रुपये)
घेऊन सुईनी सारखे त्या पाकिस्तानच्या मदतीला धावुन गेले.......
याचाच आर्थ, "शंभू राजे", माफ करा आम्हाला,
आम्ही ही किती शॅंड आहोत....?
...आपली सोललेली लक्तर आम्ही सुद्धा त्याच गर्दीत उभे राहून
या बेशरमी नजरेतून आणि नुसत्या पोसलेल्या देहयष्टीने पहात आहोत.
उलट आमच्यातीलच काही "हिंदु" तुमच्या नावाचा
दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत.
ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या
धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही अभागे
हे सर्व निमूट पणे पाहात आहोत.


Z 

आम्हाला...... क्षमा करा......"राजे"
.........आम्हाला क्षमा करा.


!! जय हिंद जय महाराष्ट्र !!!

या संदेशाला इतक्या लोकापर्यंत
पोहचावा कि प्रत्येक भारतीय हा संदेश वाचेल. गंभीरपणे यांचा विचार करा.
तुम्ही
विनोद पाठवू शकता तर हा संदेश का नाही?
जबाबदार नागरिक बना....

"मराठा तितुका मेळवावा, महराष्ट्रधर्म वाढवावा"

जय भवानी ! जय शिवाजी !!

मराठीला कधीच कमी समजू नका..!
images?q=tbn:ANd9GcQ_3Cvr2y6zozTkx7K5-SIbVhd1H4FwZlwOtYpFJHBRka0eHJCw 

जय महाराष्ट्र..../>
करा कष्ट......./
व्हा श्रेष्ठ......./


मराठी असल्याचा गर्व आहे.............असलाच पाहिजे

Friday 15 April 2011

कथा सुकलेल्या गुलाबाची ....

कथा सुकलेल्या गुलाबाची ....
10.jpg

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची,
आणि , हसरया , खेळत्या , ताज्या , टवटवीत गुलाबाची.

तो तिला पहायचा , आणि सारं जग विसरायचा,
ती सुद्धा त्याला पहायची , पण पाहिल्यासारखं करायची.

बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची,
बसमधल्या गर्दीत सुद्धा , ती , त्याला दिसेल , असंच बसायची.

कॉलेजमधल्या गलक्यामध्ये त्याला फक्त तिचाच आवाज ऐकू यायचा,
चोरट्या नजरेतून तिनं टिपलेल्या त्याच्या नजरेतल्या भावना तिला समजायच्या.

गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्यानं घेतली,
ती नसतानाही तिथं , हळूच त्याच्याकडं बघून हसू लागली.

पुरे झालं मौनव्रत , बस्स झालं आता,
तिचाच विचार करून करून भणभणउ लागला माथा.

आणि एक दिवस त्यांना मनाशी पक्का निश्चय केला,
बागेतल्या गुलाबंपैकी एक गुलाब कमी झाला.

हातात गुलाब , मनात निश्चय , आणि छातीत ढोल बडवत तो निघाला,
पण , बंद पडली शब्दांची factory पाहताच समोर तिला.

' माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय ?
शब्दांविना डोळेच तिला ह्याचा अर्थ समजावतील काय ? '

तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा,
पण , शब्द बाहेर पडले , " गुलकंद छान होतो ह्याचा  ! "

त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले,
आजूबाजूचे सारे जग पोट धरून हसू लागले.

त्याच्याच शब्दांनी दगा दिला त्याला ,
हातातला गुलाब नाहीसा कधी झाला , समजलंच नाही त्याला.

तो आजही तिला गर्दीत शोधात राहतो,
असली तर दिसते , नसली तर पूर्वीप्रमाणे हळूच हसते

तो मान खाली घालून जातो , समोरून जाताना बागेच्या,
तो दिसताच गुलाब ओरडतात , " गुलकंद छान होतो आमचा ! "

हि कथा होती त्याची , तिची आणि ........
आणि एका हसऱ्या , खेळत्या , पण आता सुकलेल्या , तिच्या पुस्तकात  जपून ठेवलेल्या , गुलाबाची .......
 

बायको म्हणजे एक सावली

बायको म्हणजे एक सावली
उन्हाला शांत करणारी
बायको असते पावलोपावली
घराला घरपण देणारी

बायको म्हणजे निश्चिंतता
घर सुरळीत चालेल याची
बायको म्हणजे नेमकी जाणीव
गृहस्थाला कर्तव्याची

बायको म्हणजे ओले केस
न्हाल्यानंतर भुलवणारे
बायको म्हणजे सुगंधाचेच
कारण जीवनात दरवळणारे

बायको म्हणजे गोड कारण
घरी लवकर जाण्यासाठी
बायको म्हणजे प्रेमळ घास
हसत हसत खाण्यासाठी

बायको म्हणजे प्रेमळ काळजी
हवीहवीशी वाटणारी
बायको म्हणजे अधिर ओढ
अस्तित्वाला व्यापणारी

बायको म्हणजे सावध विवेक
सगळीकडे जाणवणारा
बायको म्हणजे नेमका आवेग
सुरळीत गाडा चालवणारा

बायको म्हणजे संपूर्णता
गृहस्थाच्या जगण्याची
बायको म्हणजे समर्थता
माणसाला यश पचवण्याची..

शेवटचे घरटे

शेवटचे घरटे
'आई, बटन तुटलंय ग शर्टचा...आणि बघ ना किती खराब झालाय तो...' महेश दारातून ओरडतच येत म्हणाला. महेशचा आवाज ऐकून तिने पटकन रिकाम्या डब्याचं झाकण लावलं. डाळ उरलीच नव्हती डब्यात. तसंच डबा बाजूला ठेवत ती महेशकडे वळली. महेश पोळीच्या डब्यात कालची उरलेली पोळी आहे का ते बघत होता. 'आई, पोळी नाही? ' महेशच्या प्रश्नावर तिला भडभडून आलं. कसनुसा हसत ती म्हणली. 'करणार रे पोळी. जा, तू बाबा आले का बघून ये'. 'कुठे गेले बाबा?' महेशचा पुढचा प्रश्न. तोंडावर आलेला उत्तर तिने थांबवलं, आणि सावकाश ती म्हणाली, 'तुला नावं शर्त आणायला.' महेशचा चेहेरा खुलला. तो नाचतच अंगणात जाऊन बाबांची वाट पाहू लागला.
तिने शेगडी पेटवली. तांदळाच्या डब्यात उरलेला मूठभर भात तिने कुकरमध्ये शिजवायला लावला. शिजवतानाच त्यात थोडे कांदे आणि मसाला घातला. कुकर व्हायची वाट पहात ती ओट्याजवळ उभी राहिली. कुकर नवर्याने हौसेने आणलेला. घरातला बाकीचं सगळंच मोडून झालं होता, तेवढा एक कुकर तिने अजून विकला नव्हता. बाकीचं समान असंच कुणी दिलेला लग्नात. तेव्हा जे कोणी यायचं काय काय घेऊन यायचं, आणि तीही आल्या-गेल्याचा करण्यात रमून जायची. पण मग २ वर्षात... तिला त्या दिवसाच्या आठवणीने गरगरल्यासारखं झालं. अजूनही तिला खोटं वाटायचं, एखाद्या स्वप्नासारखा. तिला मिठीत घेऊन गुदमरवणारा नवरा जेव्हा त्याचा एक थोटा हात आणि तुटका पाय घेऊन केविलवाण्या चेहऱ्याने घरी यायचा तेव्हा तिला उन्मळून जायला व्हायचं. अपघातातून सावरल्यावर तिने त्याला सरकारी दाखला आणून एखादी नोकरी करण्यासाठी सुचवला. महेश तेव्हा जेमतेम वर्षाचा होता. नवर्याने ऐकलं नाही. त्याचे मित्र यायचे आधी आधी, काही करण्यासाठी सुचवून पाहायचे. तो झिडकारायचा , म्हणायचा, 'पांगळा आहे म्हणून दया नको तुमची.' मग महेशकडे आणि दाराआडून पाहणाऱ्या तिचा निरोप घेऊन आलं माणूस निघून जायचा. काहीच सुचला नाही कि तो कुबड्यांवर स्वतःला ढकलत ढकलत निघून जायचा कुठेतरी. मग घरी यायचं घामाघून होऊन, तिच्याकडे बघायचाही नाही. भरपाईचे पैसे घराखर्चात आणि महेशाला शाळेत घालण्यात संपले. महेशाची शाळा सुरु झाल्यावर तिने उमेदीने स्वत नोकरी करू पाहिली. पण तिने आणलेलं काही तो खायचा पण नाही. महेशला सांगायचा कि तो काम करेल, त्याला खूप मोठा करेल. त्याला हसवायचा. आणि मग स्वताचे डोळे टिपत आकाशाकडे बघत बसून रहायचा. एक दिवस त्याने गाडीखाली जीव द्यायचा प्रयत्न केला. लोकांनी वाचवला, घरी आणला. तेव्हापासून तो अजून आक्रसत गेला. ती जवळ आली कि रडायचा. तुझ्या जीवावर जगतो, मरू पण शकत नाही आपल्या मर्जीने म्हणायचा. ती कामावर गेली कि निघून जायचा कुठेतरी. कोणाकडून तरी पैसे मागून महेशला काही घेऊन यायचा. एक दिवशी कोणीतरी म्हणाला कि जगतो कसा मस्त बायकोच्या जीवावर. ते जिव्हारी लागल्यागत घरी आला, आणि तिला नोकरी सोडायला लावली.
मग घर रिकामं होत गेला. महेशचा रिझल्ट लागला शाळेचा आणि आता ५वित प्रवेश घ्यायचा होता. भरायला पैसेच नव्हते. उद्यापासून शाळा सुरु होणार होती. महेश विचारायचा पुस्तक, वही, कंपासपेटी केव्हा घ्यायची. ती वेळ मारून न्यायची. मग बाबाकडे गेला कि बाबा त्याला काय काय सांगून रिझवायचा.
तिने कुकर उतरवला. ताटे घेतली. तेवढ्यात महेशचा बाहेर आवाज आलं, 'आई, बाबा आले. आणि मला नवा शर्ट आणि पुस्तक पण आणलंय.' गोष्टींचं पुस्तक घेऊन महेश तिला बिलगला. त्याच्या खांद्यावर नवर्याने नवा शर्ट पांघरला होता. तिला आवडणारा आकाशी रंग.... 'आणि बाबांनी हे तुला दिलंय. तिने पिशवी घेतली. त्यात एक फूल आणि डबा होता श्रीखंडाचा. तिने फूल ओट्यावर बाजूला काढून ठेवलं.
काल रात्री त्यांचं बोलणं झालं. तिने त्याला उरलेले पैसे दिले होते.
कुबड्या भिंतीच्या कडेला टेकवून तो खाली बसला. महेश त्याच्या बाजूला बसून पुस्तक वाचत होता. तिचे डोळे उगाच भरून येत होते. तिने ताटात भात वाढला. कडेला श्रीखंड वाढलं.
तेवढ्यात मनी आली दारातून आणि म्याव म्याव करत महेशच्या पायात जाऊन बसली. महेश तिचे लाड करत तिला गोष्ट सांगायला लागला. आणि ते वेडं मांजर पण मान त्याच्या मांडीवर ठेवून जसं ऐकायला लागलं.
किती दिवसाने ते गप्पा मारत मारत एकत्र जेवले. खूप दिवसांनी आज गोड खायला होतं. महेशने आवडीने श्रीखंड खाल्लं. आणि मनूने पण महेशच्या ताटातलं श्रीखंड खाल्लं. जेवण झाल्यावर गप्पा मारत ते तिथेच बसले. मनू महेशच्या मांडीवर गुपचूप झोपली होती. हळूहळू बाबाची गोष्ट ऐकता ऐकता बाबाच्या कुशीत महेश झोपून गेला. तिने ताटे उचलली. कुकर आणि श्रीखंडाचे रिकामे भांडे बेसिन मध्ये ठेवले. ओट्यावरचे फूल तिने हातात घेतलं आणि नवर्याकडे पाहिलं. तो भिंतीला मान टेकवून झोपला होता. त्याचा रापलेल्या गालांवर, खुरट्या दाढीत त्याच्या डोळ्यांतून ओघळलेले अश्रू लपले होते. तिने ते फूल घेतलं, आपल्या बाजूला ठेवलं आणि तिथेच लवंडून ती झोपली.

....... दुसर्या दिवशी पेपरात आलेल्या बातमीत अपंग तरुणाची बायको आणि मुलासह आत्महत्या एवढाच मथळा होता. त्यांची घरभर विखुरलेली स्वप्नं, त्यांच्या गप्पांचे आवाज, गोष्टीचं नव पुस्तक, एकदाच घातलेला आकाशी शर्ट, मरून पडलेलं मांजर आणि तिच्या कुशीत सापडलेलं कोमेजलेलं फूल ह्यांचा उल्लेख तसा महत्वाचा नसतोच म्हणा....

Wednesday 13 April 2011

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….

गाईचे वासरावरती असते ते प्रेम………

चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………

आईचे मुलांवर असते ते प्रेम………

नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………

अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..

प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,

पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..

आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…

खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!

तर….
खरे प्रेम असावे…..

कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,

त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..

गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,

तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..

आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..

कुठेही गेले तरी न संपणारे,

सदैव आपल्या बरोबर असणारे…..
खरे प्रेम असावे…..

पैशाने विकत न घेता येण्यासारखे,

वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,

टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवनीने दे
बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवनीने दे
बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे
उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवनीने दे
मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवनीने दे
आठवणीने दे..... ......
कोणतेही करण न देता  ती मला सोडून गेली.....!ij.jpg
कोणतेही करण न देता
ती मला सोडून गेली...
ह्या हसनार्या डोळ्याना
अश्रुंची भेट देऊन गेली...
ij.jpg
जाता जाता बघा ना
काय करून गेली...
ह्या दगडाला
प्रेम शिकवून गेली...
ij.jpg
दोन दिवसात तिच्या
हाताला मेहंदी लागली..
माझी माझी म्हणताना
ती मलाच परकी होउन गेली..
ij.jpg
गेली सोडून पण..
मला तिचे वेड लावून गेली..
मला पण तिच्या आठवाणित जगायची
सवय होउन गेली..
ij.jpg
काल ती मला
त्याच्या सोबत दिसली..
मला पाहताच नेहमीप्रमाणे
गोड हसली...
ij.jpg
माझी नजर थबकली
ती माझ्याकडेच
एक टक बघत होती...
ij.jpg
तिच्या जवळ गेलो..
आणि म्हणालो...
जोड़ी छान दिसते..
आणि मनातल्या मनात हसलो..
ij.jpg
ती म्हणाली अरे
मम्मी तुला विचारत होती..
तुझा मित्र लग्नाला आला नाही..
म्हणुन खुप रागावली होती..
ij.jpg
मी म्हणालो..
माझ्या पाठीत कोणीतरी
सुरा खुपसला होता...
जखम खुप खोल झाली होती...
ij.jpg
वार पाठीवर पण..
जखम मनावर झाली होती..
जखम पण
जवळच्या व्यक्तीने केलि होती
ij.jpg
तिची ताठ मान शरमेने झुकली..
ती फिरली आणि चालू लागली..
तिची पाठमोरी आकृती..
माझा ओल्या डोळ्याना अस्पष्ट दिसू लागले........
ij.jpg

कवितेला मी माध्यम बनवून

कवितेला मी माध्यम बनवून
एकच अर्चना माझी जाणून
कोणासमोर आणू दर्शना
प्रकट करतोय माझी भावना.
...
प्रेरणा कुठे दिसत नाही
स्वप्नासाठी जगतोय
मीच माझी प्रतिमा पाहून
जगी स्नेहाची ओळख देतोय
रेशमाचे जुने नाते
अभिलाषा मनात आणते
आठवून ती निवेदिता
प्रचिती रसिका येते
प्रीतिने मज फूल द्यावे
तृप्तीने नयनात झुलावे
कोमल सरोज सुन्दर असुनही
प्रजक्ताला जवळ घ्यावे
कल्पना कल्पिता मानसी
चांदण्यात कृतिका हसली
संगीताशी इतकं नातं जुळलं
की सीमा सोडावी लागली
विणाने वेडं केलं
मैफिलीत शोभा आली
मग मेघाने घोळ घातला
आणि रुचा निघून गेली
श्रद्धा आलो घेउन
ओढ़ लागली भक्तीची
मनात माझ्या पूजा ठेवून
वाट पाहिली आरतीची
अमृताचा शोध घेतांना
संजीवनी जीवनी आली
समृद्धीच्या नादात
शांती विसरावी लागली
आधी विद्या मग किर्ती
निशानंतर उषा जाशी
आधी माया मग मोहिनी
छायानंतर ज्योति जशी..... छायानंतर ज्योति जशी..

दोन पाखरांचा संसार होता...

दोन पाखरांचा संसार होता...
वास्तवात नाही पण तिच्या स्वप्नात होता..

१४ फेब्रुवारी ला लग्न...
 
आणि करायचा विचार होता..

लग्नानंतर रोज एक चोकलेट..
 
आणि रोज बाहेर फिरायला जायचं असा तिचा हटट होता..

आपले चौघांचे कुटुंब असेल..
 
मोठी कृपा तर छोटा पार्थ असेल...

दर १ नोव्हेंबर ला कैंडललाइट डिनर..
 
तिथे आपल्या दोघं शिवाय आणखी कुणी नसेल..

आपल्या दोघांच छोटस घर असेल..
 
गुलाबी भिंती आणि मार्बल फ्लोर असेल..

कृपा ला डॉक्टर आणि पार्थ ला स्पोर्टसमन बनवायचे...
 
आणि आपण आपल्या जबाबदारीतुन मुक्त व्हायचे....

आमच्या ह्या संसाराला कुणाची तरी नज़र लागली...
 
आमच्या स्वप्नाची नाव नशिबाच्या सागरात बूडू लागली..

त्या बुडणाऱ्या नावेकडे बघन्यावाचून कोणताच पर्याय नव्हता...
 
घात करणाऱ्या त्या लाटा थाम्बायाचे नाव घेत नव्हत्या...

शेवटी स्वप्नांची ती नाव बूडून गेली...
 
पाखरांच्या स्वप्नाना तडा देऊन गेली..

स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती...
 
आता कधी जिव निघून जातो ह्याकडे नज़र लागली होती...

Wednesday 6 April 2011

तीचा वाढदिवस..

आज होता दिस आनंदाचा
कारण तो घेऊनी आला होता
क्षण तिच्या वाढदिवसाचा..

आजच्या या दिवशी
उमलली होती ती नाजुक कळी
मातेला झाला होता हर्ष त्या सोनसळी..

मग तिनं टाकल होतं
अलगद पाऊल या जगात..
नव्ह्ते माहीत तीला चटके बसणार होते उन्हात...

मग थोडं मोठं होवूनी
अंगुली पकडुनी त्या पित्याची
केली होती सुरु वाटचाल त्या भविष्याची..

होताच मॊठी तीने जिंकली
आपुलकिने मने सर्वांची..
कारण अजब लकेर होती तीच्या त्या हसण्याची..

हे सारं वर्षानुवर्षे
असच घडत होत..
आय़ुष्यातील नव्या वर्षाच पान असच उलगडत होतं

खुप काही मिळवलं होतं
तिने आपुल्या या जिवनात..
नंदनवने उभारली होती रखरखलेल्या वाळवटांत..

म्हणून आजचा हा क्षण
पुन्हा तिच्या वाट्याला आला..
गत आठवणीने तिचा कंठ दाटुनी आला..

नव्या उमेदीच्या नव्या भरारया
तिने अश्याच घेत राहो ..
एवढ्या शुभेछ्याचं पुष्पगुछ्च मी तिला दिलं...

तीच्या या वाढदिवसाची
अनोखी भेट म्हणून
मी ही कवीता तिला समर्पित केली...

माझी हि अजब कल्पना
पाहूनी ती डोळे भरुनी मला म्हणाली...
तु दिलेलं हे कवीतपत्र कधीच विसरणांर नाही..
नुसतं एक कागदचं चिठोरं म्हणून रद्दीत कधीच टाकणार नाही....

......शेवटची नजर ...........


........शेवटची नजर ...........
माझ्याकडे पाहात जेंव्हा
शांत निघून जातेस,
अश्रू भरल्या डोळ्यानीच
सर्व सांगून जातेस,
माझ्या प्रेमाची उणीव तुला
सतत भासवत राहील
काही क्षण का होईना पण
माझी आठवण येत राहील,
माझ सोड काही नाही
तू स्वताला जपत जा
रोज रात्री स्वप्नात मात्र
एकदा तरी येत जा,
मी आता जगतोय खरा पण
फक्त खोट्या आशेवर
तू येशील म्हणून आणखीन हि उभा आहे
तुझ्या त्याच परतीच्या वाटेवर ..........

Friday 1 April 2011

भय्या हातपाय पसरी


 भय्या आणि मनसे यांचं नातं विलासराव आणि अशोकराव, उद्धव आणि राज किंवा मायावती आणि मुलायमसिंग यांच्यासारखे विळ्या-भोपळ्याचं आहे, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे मनसेतील महिलावर्गाचे म्हणणे आहे. श्वेता परुळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून चार उपाध्यक्ष मनसेचा महिला मोर्चा सांभाळत आहेत. त्यापैकी एक रिटा गुप्ता आहेत. याखेरीज शालिनी ठाकरे, शिल्पा सरपोतदार आणि आशा मामेटी या आणखी तीन उपाध्यक्ष आहेत. गुप्ता या राज ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार सुरेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत. त्यातच त्या पूर्वाश्रमीच्या हवाईसुंदरी असल्याने त्यांचा तोरा काही और आहे. गुप्ता यांच्याप्रमाणेच शालिनी ठाकरे यांचाही जमिनी राजकारणाशी म्हणजे मनसेपुरता लाठ्याकाठ्या खाणे, जेलची हवा खाणे, कोर्टातील तारखांना हजेरी लावणे वगैरे वगैरेशी सुतराम संबंध नाही. शिल्पा आणि आशा या जमिनी राजकारणात मुरब्बी आहेत. थोडक्यात, महिलांत चक्क उभी फूट आहे. दादरच्या महिला विभाग अध्यक्ष प्रभा चित्रे यांचा आणि रिटा गुप्ता यांचा मध्यंतरी वाद झाला. वळणा वळणाने पाणी त्यांच्या भय्या असण्यापर्यंत पोहोचले. मग गुप्तांचेही भय्यापण जागे झाले. भय्यामुळे तुमच्या कपड्यांना इस्त्री होते, भय्याच तुमच्या घरी पेपर टाकतो, तोच टॅक्सी चालवतो, असे रागाच्या भरात आपली मराठी पोलिटिकल लाइन विसरून गुप्ता बोलून गेल्या. गुप्ता किती डोळ्यात खुपतातचा हा वाद थेट राज ठाकरे यांच्या न्यायालयात गेला. दोन्ही बाजू ऐकल्यावर राजसाहेबांनी झंडूबामची बाटली काढून फसाफसा तो कपाळाला चोळत महिला मंडळापुढे डोके टेकले...