Search This Blog

Thursday 28 April 2011

यशाला शॉर्टकट नसतो

यशाला शॉर्टकट नसतो. व्यवसायात पूर्ण मार्ग वाटचाल करुन गेल्यावरच यश मिळते.
* दर्जेदार माल आणि उत्तम सेवा याद्वारेच तुम्ही ग्राहकांना प्रभावित करु शकता।
* व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढवायचे असेल तर अनावश्यक खर्च टाळायला हवेत।
* ग्राहकांशी नेहमी थेट आणि नेमक्या शब्दांत संवाद साधणे फायदेशिर ठरते.
* ज्याला इतरांवर आपला प्रभाव पाडण्याची इच्छा असते, त्याने कधीही कुणाचा अपमान करु नये.
* यश हे केळ मुक्कामाचे ठिकाण नव्हे, तर तो एक अखंड प्रवास आहे.
* माणसांची पारख करण्याचे कौशल्य हे सुखी जीवनाचे रहस्य आहे.
* भुतकाळाचे भान, वर्तमानाचं ज्ञान आणि भविष्याचं विज्ञान जेव्हा एकवटतं तेव्हाच प्रगतील सुरुवात होते.
* तुम्ही जे ध्येय ठरविले असेल, तसा आकार तुमच्या जिवनाला प्राप्त होईल.
* व्यवसायाची जाहिरात प्रभावी करायची असेल तर त्यासाठी व्यवसायाची पार्श्वभुमीही तितकीच प्रभावी असणे आवश्यक असते.
* तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणचे स्वागत कक्ष कसे आहे. यावरही तुमच्या व्यवसायाचे यश अवलंबून असते.
* व्यवसायातील प्रतिसर््पध्याचा पदोपदी अपमान करुन नव्हे; तर त्याच योग्य मान राखुन त्याच्याशी निखळ स्पर्धा करा.
* जगातील सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे समजूतदारपणा.
* मधुर वाणीच्या व्यावसायिकाच्या दारात दारिद्रय कधीही येत नाही.
* व्यवसायात तुमची गुंतवणूक किती आहे, यापेक्षाही महत्चाची बाब म्हणजे व्यवसायावर तुमची निष्ठा किती आहे?
* मनुष्याला जगण्यासाठी अन्नाची जेवढी गरज असते, तेवढीच वाचनाचीही गरज असते.
* प्रसन्न चित्ताने तुम्ही जे व्यवहार कराल ते फायदेशिर ठरतील.
* ग्राहकांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी एक तक्रारपेटी तुमच्या व्यावसायाच्या जागेत असणे फार आवश्यक आहे.
* नुसत्या कल्पनेपेक्षा प्रत्यक्ष उदाहरण हे नेहमीच जास्त परिणामकारक असते.
* जो चालतो तोच पोहोचतो. जो फक्त विचार करीत राहतो तो कधीच पोहोचत नाही.
* माफक नफ्यासाठी तुम्ही ग्राहकांशी खोटे बोलाल तर भविष्य काळात तुम्हाला फार मोठा तोटा सहन करावा लागेल.
* व्यावसायिकाच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यावरही व्यवसायातील नफ्याचे प्रमाण अवलंबून असते.
* विक्रीपश्यात सेवेलाही व्यवसायात विक्रीइतकेच महत्व असते.
* व्यवसायासाठी असे ठिकाण निवडा तिथे तुमचे संभावित ग्राहक अगदी सहजपणे पोहचू शकतील.
* व्यवसायातील केवळ जमा-खर्चाचाच हिशोब ठेवू नका, तर अनावश्यक खर्चाचाही हिशोब ठेवा.
* काही गोष्टींना स्पष्ट शब्दांत नकार देणे हा गुण व्यवसायात फार महत्वाचा असतो.
* व्यवसाय करताना केवळ नफा मिळविण्याकडे लक्ष देवु नका, तर ग्राहकाचा विश्वास कसा मिळविता येईल, याकडेही लक्ष द्या.
* ग्राहक तुमच्या दुकानातून खरेदी करुन जात असताना ' आणखी काही हवंय का साहेब ? हा प्रश्न त्याला विचारायला मुळीच विसरु नका.
* बाजारात आलेले नवे उत्पादन विके्रत्याने आधी स्वत: पारखून घ्यावे. मग ते विक्रीसाठी उपलब्ध करावे.
* हातून घडलेल्या चुकांबाबत विचार करण्यात वेळ वाया घलवू नका, त्यापेक्षा भावी काळात चुका टाळता कशा येतील याबाबत प्रयत्न सुरु करा.
* तुम्हाला शक्य नसल्यास कामासाठी वेळीच स्पष्ट नकार द्यायला शिका. त्यामुळे तात्पुरता वाईटपणा आला, तरी पुढील अनेक कटकटी टाळता येता.
* काही निर्णय चुकीचे ठरले तरी चालतील, पण आपले निर्णय स्वत:च घेण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे.
* तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करा. जनसंपर्क वाढविण्याच्या दृष्टीने ते फायदेशिर ठरेल.
* तुम्ही तुमची कामे जितकी पुढे ढकलाल तितके यश तुमच्या पासून दुर जाईल.
* तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक नवपरिचीत व्यक्तीचे नाव अशा प्रकारे लक्षात ठेवा की पुढील भेटीत तुम्हाला त्या व्यक्तीला तिच्या नावाने संबोधता आले पाहिजे.
* तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्ही प्रगतीपथावर आहात असे म्हणता येईल.
* प्रत्येक वादाच्या मुद्दयावर, समस्येवर पहिला उपाय म्हणजे चर्चा, चर्चेतून अनेक प्रश्न सहजपणे सुटु शकतात.
* परिस्थितीप्रमाणे स्वत:ला बदलण्याची तयारी ठेवा. यश सदैव तुमच्या पाठीशी राहील.
* हाती घेतलेले काम आधी पूर्ण करा. मगच दुसऱ्या कामाकडे लक्ष द्या. एकावेळी अनेक कामे डोक्यात असतील तर कोणतेही काम व्यवस्थित पार पडणार नाही.
* तुम्ही दिवसभरात जे काही चांगले पाहाल किंवा ऐकाल त्यांची नोद डायरीत करुन ठेवा. त्याचा तुम्हाला भविष्यकाळात निश्चितच फायदा होईल.
* केवळ प्रयत्नांमुळे नव्हे; तर प्रयत्नांच्या सातत्यामुळे यश मिळते हे कधीही विसरु नका.
* ग्राहकाचा वेळ वाया न घालविण्याचे तत्व जो पाळतो, तोच व्यावसायीक यशस्वी होतो.
* कमी वेळात जास्त काम ' याचा अतिरेक टाळावा, कारण त्यातून अनेक प्रकारचे ताण व संघर्ष निर्माण होवुन शेवटी वेळेची हानीच होते.
* खोटेपणाचा आधार घेवुन नफा मिळविणे शक्य असते. परंतु तो नफा व्यावसायिकाला अनेक संकटांच्या जाळयात अडकवून टाकतो व त्यातून बाहेर पडता येणे शक्य नसते.
* वेळ : वेळेचं महत्व समजून घ्या. वेळ वाया घालवू नका. लाखो करोडो रुपये देवुनसुध्दा आपण वाया गेलेला एक क्षण विकत घेवू शकत नाही. वेळ तुमची तेव्हाच कदर करेल. जेव्हा तुम्ही वेळेबरोबर चालत रहाल.
* पुस्तक : बौध्दीक खुराक देणार, ज्ञान वाढवणारं सर्वात उपयोगी साधन चांगली पुस्तकं आपल्याला नेहमीचं उत्साहीत करतील, आणि नकारात्मक विचारांपासून दूर ठेवतील. म्हणतात ना वाचाल तर वाचाल.
* विचार : नव्या आणि चांगल्या विचारांचं नेहमीच स्वागत करा.
* मित्र : नेहमी चांगले आणि नवनवे मित्र बनविण्याचा प्रयत्न करा. यामुळे जगाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलू शकेल.
* आत्मपरिक्षण : वेळोवेळी आत्मपरिक्षण करुन स्वत:ला पारखा. आपल्या उणिवा शोधून काढून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करा. चांगली टीका करणारे आपले मित्रसुध्दा आपल्या वाईट सवयींना सुधारु शकतात.
* कधीही आपला विचार नकारात्मक नसावा. तो सकारात्मकच असला पाहिजे.
* हातावर हात ठेवून बसू नका तसेच केवळ स्वप्नेच पाहत राहू नका तर ती सत्यात आणण्यासाठी योग्य दिशेने पाऊल टाका.
* जीवनात रिस्क घ्यायला शिका, कारण रिस्क किंवा जोखमीविना कोणत्याही कामात यशाची खात्री बाळगता येत नाही.
* नेहमी आशावादी दृष्टीकोन बाळगा.
* आपला आत्मविश्वास टिकवून ठेवा, तसेच आपले निश्चयही ठाम असावेत.
* उत्साह कायम असावा, परंतु त्याचबरोबर अतिउत्साहापासूनही स्वत:चा बचाव करावा.
* निराशा आणि काळज्या दूर ठेवा.
* लहान सहान अपयशाने खचून जावु नका. लक्षात असून द्या, की जर तुम्हाला गुलाबाचं फूल हवे असेल तर त्यासाठी काटयांनादेखील तोंड द्याव लागेल.
* चांगले शिक्षण देणारी पुस्तके आणि नियतकालीके वाचा.आपल्या चुका सुधारा आणि इतरांशी तुलना करण्याची सवय सोडून द्या

No comments: