Search This Blog

Sunday 27 February 2011

BOOK MARKS

१)लोकाना अपेक्षेपेक्षा जास्त द्या.. पण मनापासून . आणि  हे देण म्हणजे केवळ पैसा नाही.
२)नेहमी फक्त तुमच्या कानावरच विश्वास ठेवू नका .. तेच तुमच्या पैशाचाही . खिशात  आहेत म्हणून सारे पैसे एकावेळी खर्च करू नका .. तेच तुमच्या झोपेचाही . मनात येईल  तितका वेळ ताणून देऊ नका .
३) सॉरी म्हणायची वेळ आलीच तर मनापासून म्हणा ..
सॉरी  म्हणन म्हणजे पुन्हा ती चूक न करण्याच वचन!
४) कुणाच्याही स्वप्नाची चेष्टा करू नका. ज्यांच्या डोळ्यात  स्वप्न नसतात , त्या माणसांच्या आयुष्यात जगण्यासारख फारसं काही नसतं.
५) प्रेमात पडणारच असाल तर मनापासून पडा, पण प्रेम निभावण सोपं नसत . मनाच्या  चिंध्या होतीलही कदाचित , पण आयुष्य समृद्ध करणारी प्रेमापेक्षा मोठी दुसरी  गोष्ट नाही.
६.) वाद  होणारच . पण ते करताना मुद्दा सोडून अर्रोप करू नका. आरडओरडा , आरोप म्हणजे  वाद न्हावे. आपलं म्हणण शांतपणे मात्र ठाम राहून सांगता येतच.
७) पैशाने माणसे जोखू नका. माणसाचं मोल जगात काशुनही जास्त असतं !
८) जगात सोपं काहीच नसता. मोठी स्वप्न पाहून मोठ यश  मिळवायचं असेल तर मोठा धोका  पत्करावाच लागतो.
९) नेहमीच यश कसं मिळेल , कधीतरी हार पत्करावीच लागते . हार स्वीकारा , पण हरण्याचं  दुखं विसरून जा ! लक्षात ठेवा त्या  हारण्यान शिकवलेला  धडा .
१०) छोटंसं भांडण झालं म्हणून जिवाभावाची मैत्री तोडू नका.



SWAPNIL MHATRE 
(LOKMAT OXYGEN - - FRIDAY 16 OCTOBER 2009)

No comments: